वा-याची सुरु झाली ढगांशी लढाई…
चमकत चमकत आली वीजबाई..
हृदयाच्या स्पंदनांचा वाढला वेग..
आकाशात चमकली जेव्हा एक रेघ..
टप टप पडताना थेंब होती मोठे..
पावूस येता जोराचा नाणे झाले खोटे..
आता वाहे झुळूझुळू पाणी नाल्यातून..
आठवणी तरंगती कागदी होडयातून…
मन आणि पावसाचे नाते ताजे ताजे ..
पागोळीच्या पैंजणाचे थेंब कसे वाजे
राहतो गारवा आता इथे तुझ्याविना…
तुझ्या आठवांचा ठेवून खजिना…
पुन्हा ये ना जरा तुझी सर सर घेवून.
घटट मिठी मार ना रे धरतीला बिलगून..
तुझे आणि जमिनीचे नाते कसे भारी..
झेलते ग भूमी तुझ्या सगळ्याच सारी…
जातानाही तू जेव्हा जाशील निघून ..
पुन्हा परतायचे वचन देवून…
जाशील तेव्हा तुझे थेंब घेवून जाशील…
डोळ्यामध्ये आमच्या थेंब ठेवून जाशील…
तू येशील तू येशील
तुझी वाट आम्ही पाहू..
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…
तुला आठवत आम्ही पाऊस होवून जाऊ…