मृत्यू

मृत्यू कुठून कसा सहज बिलगत चाललाय..
आपल्याला…
कुठे अपघातात मिळतो, तर कुठे रुग्णालयात मिळतो..
कधी हृदय विकाराने, तर कधी दुस-याच विकाराने मिळतो..

कुणाला आत्मदहनामुळे मृत्यू मिळतो…
तर कधी कधी कुणाला गळफासाने मृत्यू मिळतो…

कधी छोट्या कारणाने तर कधी मोठ्या कारणाने मिळतो..
भूकंप, पूर, वादळ, त्सुनामी तर कधी स्वताच्या कारणाने…मिळतो..

हल्ली हा मृत्यू फारच स्वस्त झालाय म्हणे…
कधी स्वताहून आपण मरणाकडे चालत जातो,
आताशा मृत्यू बेकरीतही मिळतो म्हणे..
तपासाचे धागे दोरे सुटत नाहीत…
पण नात्यांचे धागे दोरे, जीवंतपणाची नातीगोती तुटून जातात..
आसमंतात पाहत बसतात डोळे वाट त्या जिवलगांची…
पण तिथे परतीची वाटच नसते बर. का…
आशेचे किरणही तिथून पसरत नाहीत…
आपण तिथे गेल्याशिवाय पुन्हा ती माणसे भेटत नाहीत.

पुन्हा रुदन कोरडे कोरडे..होत जाते..
अश्रू सुकून एक रक्तीमेचा थर साचतो डोळ्यात..
आणायचं कुठून उत्साह.. तोच उन्मेष.. पुन्हा
नवीन उगवणा-या फुलांच्या कळ्यात..

बलवत्तर असेल तर नशीब तुम्हाला वाचवत एकदा दोनदा
पण मृत्यू गाठतोच…. कधी न कधी…
उरतो मागे मग एकाच विचार…..
जीवन म्हणजे सुख-दुखांचे भोग…
अन मृत्यू म्हणजे सगळ्यातून मोक्ष..

कवटाळून जेव्हा आपण जवळ करतो त्याला…
सलाम करावासा वाटतो…
‘मृत्यूला’ आपल्या जवळ आणणा-या नियतीला…

डोळे

जिथे तू घेतलेस माझे दुख;रूपी अश्रू
तिथेच लागलो मी मलाच विसरू..

व्यक्त न व्हावे इतुके तू तुलाच समर्पिले मला..
जे प्रीत पुष्प मी निर्व्याज अर्पिले तुला..

तू पाहता हलके हळूच बोलती डोळे..
तव नयनांची भाषा ओळखती माझे डोळे..

तव लोचनांचे आभार… पेलती जे अश्रू साभार…
हा प्रेमाचा अविष्कार… नवं उत्कर्षाचा साज संभार..

सापडायचाय मला..

मन झालेय सशासारखे..
कावरे बावरे होणारे..
भावना मनी दडवूनी…
थरथर थरथर कापणारे..

कोण न समजे.. जाणिजे,
यातना लोचने पाही.. जे..
संगती थरथरणारी अधरे..
येवून मजला सावर रे..

आकाशात लुकलुकणारा तारा…
तुझ्याच तर डोळ्यात पाहायचाय मला..
काळजाचा वेध घेणारा शब्द
कवितेत अजून सापडायचाय मला..

तुझ्यावर रुसलाय..

प्रीत माझ्या नजरेमधली ओळखली नाही तू..
काळजात या अडीच अक्षरी रेघ कोरली नाहीस तू..
म्हणून वेदनांच्या काट्यासहित
‘गुलाब’ तुझ्यावर रुसलाय..

शिशीर पानगळ देवून जातो..चैत्र पुनव चंदन देवून जातो..
माघ फाल्गुन हि येवून जाती … ऋतूपरी मी सावरतो..
तरीही अंतरातल्या पालवीसहित…
‘वसंत’ तुझ्यावर रुसलाय..

नश्वर असे हा देह खर तर..सजीवतेच्या स्पर्शाविना
सरणावरती देह जळाया..ज्वालासुद्धा जाईना..
चीतेतल्या राखेसकट..
‘आत्मा’ तुझ्यावर रुसलाय..

कळली असती प्रीत तुला तर. आता बेवारस नसतो ग.
लुकलुकणा-या ता-यासारखा तुझ्या पापणीत असतो ग.
अंतरीतल्या तळमळीसहित ..
‘जीव’ तुझ्यावर रुसलाय…

प्रश्न मंजुषा

1.Where is your cell phone?
जवळच आहे… पण शांत मोड मध्ये आहे..

2.Your hair?
लहान केले तर निवासारखे, तेल लावले तर छावासारखे

3.Your mother?
माउली

4.Your father?
न भरून येणारी पोकळी

5.Your favorite food?
१ मिसळ ३ पाव..

6.Your dream last night?
मी रात्री विचार करतो दिवसा बघितलेल्या स्वप्नाचा..

7.Your favorite drink?
चहा

8.Your dream/goal?
आपल्या भोवातालाच्या माणसांच्या चेह-यावर हसू कायम ठेवणे..

9.What room are you in?
ऑफिस

10.Your hobby?
कविता.. क्रिकेट.. मित्रांसोबत गप्पा.

11.Your fear?
एकटेपणाची… सध्या ‘भीतीच’ आहे…

12.Where do you want to be in 6 years?
१ सख्खी बायको असावी.. आणि दोन गोंडस मुले ( १ मुलगा , १ मुलगी)

13.Where were you last night?
स्वताच्या घरी

14.Something that you aren’t diplomatic?
चहा प्या… कुणाला दुखावणे नाही.. आणि आपले दुख कुणाला दाखवणे नाही..

15.Muffins?
काजू कतली, वगैरे सर्व गोड पदार्थ..

16.Wish list item?
सर्वांसाठी सुखी जीवन..

17.Where did you grow up?
महाड

18.Last thing you did?
पाव भाजी खाल्ली..

19.What are you wearing?
पांढरा शर्ट (एकदम राजकारणी वाटतोय )

20.Your TV?
आहे न… tatasky लगाया है. तो लाईफ जीन्गालाला …

21.Your pets?
मनातले विचार पाळणे…

22.Friends
अजातशत्रू

23.Your life?
घडतंय उसमे सुख मानते है हम ….

24.Your mood?
फारसा खुश नाही.. रात्र फार खाते मला..

25.Missing someone?
हो. बाप आणि जिच्यामुळे मी बाप होवू शकतो अशी व्यक्ती..

26.Vehicle?
passion plus दुचाकी आहे.. अजून ४ हफ्ते जायचे आहेत लोनचे

27.Something you’re not wearing?
स्वार्थ..

28.Your favorite store?
रूप संगम

29, Your favorite color?
पांढरा आणि काळा … ते हि रंगच आहेत पण त्यांना ब्लक नि व्हाईट का म्हणतात नि कलर
वेगळे असे का म्हणतात तेच काळात नाही..

30. When was the last time you laughed?
तसा मी हसतच असतो…. सगळ्यांच्यात असलो कि

31. Last time you cried?
what to do when tears are dried

32. .Your best friend?
चांगले खूप मित्र आहेत…

33. One place that you go to over and over?
बाथरूम

34. One person who emails me regularly?
मित्र जास्त मैत्रीणी कमी आणि matrimonial sites

35. Favorite place to eat?
जिथे चांगलं खायला मिळेल, ती कुठलीही.

आठवणींच्या पाषाणावर..

नयनी आल्या भावनांना
ओसरू देणार नाही मी..
डोळे भरतील तुझे अन..
काही घेणार नाही मी..

हात धरुनी हातात
मला स्तब्ध करशील तू..
हृदयी वसून माझ्या अंतरी..
माझे प्रारब्ध होशील तू..

असे क्षणही घेवून येतील. अश्रू पापणीच्या काठावर..
तेव्हा हे हि कोरून ठेव क्षण आठवणींच्या पाषाणावर..

आयुष्यात … कधीतरी…

बोटांची करून चिमटी
ओढला जरासा गळा,
अशा ओल्या शपथा…
घेतल्या कितीतरी वेळा..

त्या ओल्या शपथाना
होती आठवणींची खोली..
बघायचे एकमेकांच्या डोळ्यात अन
मुक्यानेच बोलायची प्रेमाची बोली..

त्या बहकत्या क्षणांना
सावरणे जड होते..
बेहोष होणे, वेडे होणे…
तेवढेच आपल्या हाती होते..

सांजवेळ ती अशी..
अनुभवलेली सागर किनारी..
परत जन्मेल का तो क्षण..
आयुष्यात … कधीतरी…

नव-स्पंदनासहित…

अंतरीच्या वादळांना मी साद घालत नाही..
विझलेल्या दिव्यांना उगाच मालवत नाही…

वाहिले वारे जोराने… तरी काहीच ढवळत नाही..
स्पंदनानि वेढलेला गाभारा आढळत नाही..

समुद्र आणि त्याच्या लाटा अफाट तरीही..
रेती रेती झालेले… किनारे मिळत नाही..

तव वादळात मी ज्या हरवलो होतो कधीचा
योग हा आत्ताचा कि भोग तो विधीचा …?

आता शांततेची खपली… झाकते जखमांना..
वारा प्रयास करतो… स्पर्शून भावनांना..

डोळ्यात तरळती अश्रू.. वेदनारहित…
मी बिलगतो त्या क्षणांना… नव-स्पंदनासहित…

आताशा

आताशा निराशेचे पदर एकावर एक असे साठत गेलेत..
क्षण तिमिरात या… थंडीविना गोठत गेलेत..

उसवायची जखम तर खपली हि मरून गेलीय…
वेदना होणार नाही इतपत नियती फुंकरून गेलीय..

कोण जाणे कुठून कुठला वसंत घेवून येईल कुणी…
शिशिरात या पालवी मनामध्ये फुलविल कुणी..

आशा आहेच.. ती वृद्धींगत होतेय..क्षणाक्षणाला..
जळतो तरी पुनर्जन्म माहित असते जसे मेणाला…

कुणी कधीही सोडून जावे.. असे खरे तर नव्हते नाते..
त्यागाला वाटे हिरमुस इतुके आम्ही सोडले धागे..

कुणी कधीही फिरून यावे..अंतरित या शोधून घ्यावे…
अंतरित या जपीन तिजला… पूजीन मी मनोभावे..

गोंधळ

आपण कुठे जात आहोत या गोंधळात मी आहे..
आता ऑफिस मध्ये तीन चार जन आले होते…
त्यात चर्चा सुरु होती… जमीन खरेदी ची
हे जमिनी घेण प्रकरण खूपच फोफावला आहे..
हा इतका पैसा येतो कुठून आणि विकल्यावर जमीन… आपण काय करायचा असा
साधा प्रश्न त्या जमीन मालकांना पडत नसेल?
इतकी गुंतवणूक इतकी स्पर्धा, कशासाठी?
इतका money मेकिंग कशासाठी?
इतके आपण असुरक्षित आहोत का? सगळे प्रश्न भंडावून सोडतात..
उठलो कि जीवनाचे रहाट गाडगे सुरु होते.. अर्थार्जन करायला हवे हे सगळे ठीक आहे
पण इतका क्लिष्ट होत चाललय सगळ…काहीच कळत नाही…
मनाला पालवी फुटावी असे क्षण निर्माण होतील का नाही या संभ्रमात मी आहे..
हा येणारा पैसा योग्य मार्गानेच आलेला आहे कि अजून काही…?
का काळात नकळत आपणच त्या वाम मार्गाने आलेल्या पैशाचे समर्थन करतो आहोत?
तुम्ही हि असेच गोंधळलेले आहात का?