आज पर्यावरण दिन आहे.. उन्हाळ्याच्या दिवसात ए सी लावायची चर्चा होवून कृती झाली पण आज फक्त झाडे लावायची चर्चा होईल .. ती जगातील का मारतील का झाडे किती लावली याचे आकडे कागदावरच राहतील? प्रत्येकाने ए सी घेण्यापेक्षा वर्षामध्ये ५ झाडे लावून ती जर जागवली तर ए सी ची गरजच लागणार नाही का? \ भविष्याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक जन आजचे solution काढतो आहे.. आजचे जीवन सुखकर करण्यात धन्यता माणूस भविष्य अंध:कारमय बनवत आहे.. हे कुठेतरी बदलायला पाहिजे न? या आपल्यापासूनच सुरुवात करू…
santvan
आज सकाळीच एक वाईट बातमी कानावर आली
पुन्हा मातीला जावे लागणार होते..
दोन महिन्यातील हि तिसरी वेळ..
आधीच्या दोन मृत्यू बद्दल मनात विचार रेंगाळे नव्हते
पण हि वेगळी गोष्ट होती..
एक मुलगी जिला काहीच काळात नव्हते..
जिच्या मेंदूची वाढच झाली नव्हती..
कुणाचा चेहरा ओळखणे नाही.. बोलणे नाही.. जोरात हसायचं किवा रडायचं एवढेच भावना व्यक्त करायचे तिचे मार्ग
आई साधी गृहिणी.. vadil air force madhun nivrutta zalele..’
तिचे vay 20 होते पण lahan mulisarakhich rahili.. baherache jag kadhi baghitale नव्हते..
आई vadilani tichyasathi je kele te pahun मनात विचार ala .. ki are… ithe 21 shatakaat jatana apan khup mothya gappa marato,
jevadhi seva tichya आई-vadilani keli titaki seva ekhadi धड-dhakat मुलगी tichya आई-vadilanchi karel kay?/ mulat kiti jan ase kartil asa prashna ahe..
roj तिचे sarva prakarachi seva आई karayachi, vadil करायचे..te tar tila tyanchya donhi hatat ghevun alitalya alit feri marayache..
tyanchya potcha gola hota to, tyani vadhavala, jamale tevadhach navhe, tar sarvasva arpan karun tyani tichi thodakyat ‘seva’ keli..
tila moksha milala, dokyala zinzinya alya, apan nusta tichi avastha baghitali tari pudhe jayache dhairya karu नाही shakat..
tyani tar tila sambhalali, tichya pratyek goshtikade laksha dile.. तिचे roj honare haal tyana sahan karanyachi shakti devane tyana kuthun dili?
apan santavanapalikade kahi karu shakato ka ya vicharane sadhya mi vicharat ahe…
क्रमश:
कुणी हात पुढे केला तर द्यावा हात विश्वासाने एखाद्याच्या हातात..
कुणी आर्थिक मदत पुढे करून छातीवर हात टाकण्यापेक्षा…
कितीतरी विश्वासू असतात असे हात..
कदाचित त्या हातांवरच्या रेषांमधेच
दडलेले असेल आपले उज्ज्वल आयुष्य.
हात पुढे करायची कृती करायला काय हरकत आहे…
इतके वाईट अनुभव आले असताना त्याच अनुभवांना लावलेली मोज्मापेची पट्टी
प्रत्येक नवीन क्षणांना लावलीस तर कधीच कुणावर विश्वास नाही ठेवू शकणार तू….
माझ्या डोळ्यात तुला दिसतोय का दगा फटका करणारा लवलेश?
तू म्हणशील असे भावनिक होवून शब्दफेक करण्याचा वय निघून गेलाय…
वय अस थोडीच निघून जात …. आणि वय हे एक मोजमाप आहे हे विसरलीस..
प्रत्येक क्षणाला जिवंत करणारी कृती करणा-याला न वय असत… न अनुभव..
तो विश्वास देतो… आणि श्वास देतो..
विश्वास असेल तरच काळात न कोण विश्वासू आहे आणि कोण विश्वास घातकी
( आगामी क्रमश: मधून )
गोंधळ
आपण कुठे जात आहोत या गोंधळात मी आहे..
आता ऑफिस मध्ये तीन चार जन आले होते…
त्यात चर्चा सुरु होती… जमीन खरेदी ची
हे जमिनी घेण प्रकरण खूपच फोफावला आहे..
हा इतका पैसा येतो कुठून आणि विकल्यावर जमीन… आपण काय करायचा असा
साधा प्रश्न त्या जमीन मालकांना पडत नसेल?
इतकी गुंतवणूक इतकी स्पर्धा, कशासाठी?
इतका money मेकिंग कशासाठी?
इतके आपण असुरक्षित आहोत का? सगळे प्रश्न भंडावून सोडतात..
उठलो कि जीवनाचे रहाट गाडगे सुरु होते.. अर्थार्जन करायला हवे हे सगळे ठीक आहे
पण इतका क्लिष्ट होत चाललय सगळ…काहीच कळत नाही…
मनाला पालवी फुटावी असे क्षण निर्माण होतील का नाही या संभ्रमात मी आहे..
हा येणारा पैसा योग्य मार्गानेच आलेला आहे कि अजून काही…?
का काळात नकळत आपणच त्या वाम मार्गाने आलेल्या पैशाचे समर्थन करतो आहोत?
तुम्ही हि असेच गोंधळलेले आहात का?
शुभेच्छा
आधी माफी मागतो… कि इतके दिवस गायब होतो त्याबद्दल
आधी बिझी होतो मग रस्त्याचे काम सुरु असल्याने फोन लाईन उखडली होती त्यामुळे नेट चालू नव्हते..
तुम्हाला सर्वाना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा…
तिळगुळ घेवून ब्लोग गोड गोड लिहावा आणि गोड गोड वाचून गोड गोड प्रतिक्रिया द्यावात/./ हीच शुभेच्छा
बाकी आता काय लिहावा काळात नाहीये.. म्हणजे सुचत नाहीये
मन शांत असेल कि सर्व काही सुचत…
नुकताच एक चित्रपट पहिला
थ्री idiots … तुम्ही हि बघितला असेलच.. नसेल तर बघा…
गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे असे माझे स्वताचे मत आहे…
एखादी पटकथा strong असेल आणि दिग्दर्शकाने प्रत्येक व्यक्तिरेखेला नीट मार्गदर्शन केले आणि कलाकाराने योग्य तो न्याय भूमिकेला दिला
कि साधी गोष्टही परिणामकारक रित्या दाखवता येते…
खूप काही शिकण्यासारखे आहे.. त्या चित्रपटातून… गंभीर विषय अतिशय मार्मिक पणे आणि विनोदाच्या अंगाने सांगितला आहे.. त्यातील चित्रपटपाहताना
चित्रपट गृहातील हशा तिथेच ठेवला आणि मनातून खूप खोलवर विचार केला तर आपणच आपल्याला नव्याने गवसू असेही मला वाटते…
किती तरी जन असेल आहेत जे engineer झालेत आणि आता software क्षेत्रात काम करीत आहेत.. म्हणजे शिक्षण आपण एक घेतो आणि अर्थार्जन करण्यासाठी दुसरे क्षेत्र निवडतो…
आपली स्वताची दिशा आधी ठरवली जात नसल्यामुळे असे होते. मी हि वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे.. पण आता प्रिंटींग क्षेत्रात आहे… संगणक चालवतो. designs बनवतो… लिहितो…
हेच मला आधी गवसले असते तर… किवा त्यावर विचार करून मीच तो मार्ग आधी निवडला असता तर मला त्या मार्गातील mile stone कदाचित आधीच मिळाले असते…
असो…..
तेव्हा नाही तर आता तरी…. इथून पुढे जास्त concentration आवडत्या क्षेत्रात करायचे..जेणेकरून आपण किती लांब जावू शकतो…. याचा अंदाज येईल.
आता नवीन वर्षात एवढेच लिहून थांबायचे नाही…. खूप लिहायचे आहे, चिंतन करायचे आहे…
एकंदरीत… आपण आपल्यातील बदलाने एक इंच तरी आपल्या आजूबाजूचा परिसरातील वैचारिक बदल घडवू शकतो… काहीतरी उदाहरण समाजापुढे ठेवू शकतो..
संस्कृतीची जपणूक करताच वर्तमानातील गोष्टीना, आव्हानांना स्वीकारत… योग्य त्या निर्णय प्रक्रियेतून समर्पक फळ कसे मिळेल याचा निदान प्रयत्न तरी करू शकतो….
निवेदन
SHADI.COM VAR HE LIHAYALA GELO PAN TITHE MARATHI FONT DISPLAY HOT NAHIYE… RAJ THAKARE NA SANGAYALA PAHIJE…
पालकांना नम्र निवेदन..
मी कर्तव्य आहे म्हणून लग्नासाठी उभा आहे म्हणून काहीठिकाणी माहिती दिली आहे..
इथे तर पैसे भरून profile हि तयार केली आहे..मी जिथे राहतो ते मुंबई किवा पुणे शहर नाही..त्याचे नाव महाड आहे.. रायगड जिल्ह्यामधील
तर सांगायचा मुद्दा असा कि मी फक्त महाड ला राहतो म्हणून किती ठिकाणाहून नकार आले आहेत…
नकाराचा कारण काय तर महाड खेडेगाव आहे म्हणून…
मला इथे स्पष्ट सांगावेसे वाटते कि महाड हे खेडेगाव नाही…
हा आता आमचा जन्मच इथला त्याला आम्ही तरी काय करणार..
आम्हीही मुंबई मध्ये, पुण्यामध्ये जावून खूप पैसा कमावला असता… तिथे असतो तर लग्न हि कदाचित लवकर झाले असते.. ..
पण इथे राहून काहीतरी वेगळे करायचे आहे… ठसा उमटवायचा आहे… फक्त पैसा कमावणे हा उद्देश नसून… समाधान जास्ती महत्वाचे…
मुंबई मुंबई करणारे कित्येक जनी आजही १० x १० च्या रूम मध्ये राहतात…. माझ्याकडे तर चक्क १००० स्क्वे फुट चा ब्लॉक आहे.. स्वताचा…
स्वतःचा व्यवसाय आहे प्रिंटींग चा.. उत्पन्न हि बराच आहे.. म्हणजे मुलीना अपेक्षित असणाऱ्या पाच आकडी..इथपर्यंत
अजून काही जमेच्या बाजू आहेतच फक्त आम्ही राहतो महाड ला हा आमचा मुलींच्या धृष्टी कोनातून चुकीचा समाज आहे..
महाड हे खेडेगाव नाही हे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो..
एका मुलीला लग्नासाठी कसा मुलगा लागतो ते गुण माझ्यात नक्कीच आहेत.
मी कमावता आहे, जबाबदारीची मला जाणीव आहे.. मी निर्व्यसनी आहे… समजूतदार आहे..
अजून काय लागत? मुली एकीकडे स्वावलंबी होत असताना हल्ली security सुद्धा बघतात.. मुलाचा पगार, त्याचा ब्लॉक …
आणि settle पाहिजे म्हणे मुलगा.. गडगंज पगार असलेल्या मुलाशी लग्न केला आणि मग त्याची नोकरी गेली तर काय करणार?
settlement म्हणजे काय? वाहत्या पाण्यात माती टाकली तर काय settle होते? माती कि पाणी? मग जगायचं कस तुम्हीच सांगा
वाहत्या पाण्यासारखा? कि मातीसारख ?
एवढ वाचून मला कुणी स्वीकारणार नाही पण तुम्ही एक गोष्ट तरी स्वीकारा कि महाड खेडेगाव नाही.. इथे खूप सुख सोयी आहे
मुळात बॉम्बस्फोट वगैरेचे tension नाही.. जीवाची धास्ती नाही..
नाही का?
सगळ्या कौशल्यासाहित आपण जन्माला येतो,
सगळा मटेरियल पूर्णपणे आत असत जन्माला येतो तेव्हा
पण कुठले कौशल्य आपण कसे प्रगत करतो, त्याला
पैलू कसे पडतात त्यानुसार एखादी कला, कौशल्य पुढे विकसित होते,
त्यात आपला रस असणे अत्यावश्यक असते,
एखाद्या कामाचा आनंद घेत घेत काम केले तर त्याचे
समाधान जास्त असते..
पैसा हि माणसाची किमान गरज आहे,
माणसाची खरी कमाल गरज हि समाधान आहे..
माणसं नेमके उलट करायला जातात
नाही का?
डोंबारी
कालच पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली
काहीतरी व्यायाम हवा ना?
आणि हल्ली तसा कुठलाही संकल्प सोडायला काय आपण काहीही सोडतो…
पण त्याची अंमलबजावणी करताना खूप प्रयास करावे लागतात..
तर घराबाहेर पडलो आणि लगेच चौक लागला
तिथे एक जुनी लोककला म्हणू आपण,
पण डोंबारी आला होता, त्याची तयारी चालू होती,
तीन खांबी बांबू दोन्ही बाजूना लावून त्यावर दोरी टांगून तयार होती….
ढोल वाजायला लागला तशी गर्दी वाढली… लहान मुलगी आधी रस्त्यावर..
उद्या मारून लागली, कोलांट्या उडया मारू लागली.. नंतर ती त्या तीन खांबी बांबूवर लीलया चढली
वय साधारण ४ ते ५ वर्ष असेल… दोरीवर चढल्यावर तिला तोल सांभाळायला बांबू तिच्या गळ्यात जी दोरी होती त्यात अडकवला..
नि त्या ढोलाच्या तालावर…. लीलया दोरीवर चालत होती.. एक दोन वेळा चालल्यानंतर.. पुन्हा ती मध्ये आली.. आणि पायाने जोरजोरात दोरी
हलवू लागली.. तिच्या या हरकती बघून मी हि क्षणभर स्तब्ध झालो…
मला ऑलिम्पिक चाम्प नादिया ची आठवण आली..
या डोम्बार्यांचे पोटच या कलेवर आधारित आहे…खूप दिवसांनी असा खेळ बघितला डोम्बारीचा…
क्षणभर लहान झालो…….. मनात असा विचार आला
अरे लीलया दोरीवर चालणाऱ्या या मुलीचे नंतर काय होत असेल?
तिचे शिक्षण तर सोडाच पण उदार्निर्वाहासाठीच असे खेळ करावे लागत असतील.
मग या खेळला तिने तिचे ध्येयच का बनवू नये..
सरकार अशा मुलांना शोधून काढून त्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यास नाकाम ठरत आहे…
जोपर्यंत राजकीय हस्तक्षेप खेळामधून जात नाही तोपर्यंत भारतीय खेळला किवा खेळाडूना
मोठ्या प्रमाणावर……. सुवर्ण पदक मिळणार नाहीत…
आपण आपले एक सुवर्ण पदक मिळाले कि त्याचेच कौतुक करत बसतो..
त्यात आपण प्राविण्य मिळवून सातत्य दाखविले पाहिजे असे खेळाडू आणि खेलासाठीच्या
सुविधा आणि प्रशिक्षांची फळी उभारली पाहिजे….
जिथे गरज आहे तिथे उदासीनता दाखवली जात आहे…
आणि नको तेच वाद चावून चावून चिघळले जात आहे
आणि त्याच भोवती आपल्याला गुंडाळून ठेवले जात आहे…
आपलीही नागरिक म्हणून काही भूमिका आहे….
आयुष्यात एका तरी मुलाला / मुलीला कुठल्याही प्रकारच्या खेळासाठी
लागेल ते… सहकार्य करण्याची… मी मनोकामना केली आहे . कालच….
त्यासाठी मी माझ्या हितसंबंध… माझ्या परीने होईल ती आर्थिक मदत करण्यास तयार आहे…
जिद्द असावी अशी जिला नसावी हद्द.
नियती हि व्हावी त्या ठिकाणी स्तब्ध.
अनुत्तरीत
तंत्र ज्ञानातील प्रगती खरच अवाक करणारी आहे.
क्षणार्धात दुसर्याशी संपर्क साधू शकणारा मोबाईल
किवा तत्काळ निरोप पोचविणारा त्यातील संदेश वाहक किवा
E-mail सेवा …
सर्व काही क्षणार्धात…
पण आपण जर जरासं डोकावलं पूर्वार्धात तर?
कारण मानवानेच तंत्रज्ञान प्रगत केल..
पण दुसर एक तंत्रज्ञान जे कुणी निर्माण केलं,
त्याचा निर्माता कोण हे एक कोड आहे..
आपण कौतुक करतो एखादा कपडा शिवल्यावर त्या शिंप्याचे.
पण अक्ख्या अंगावर एकही शिवण नसलेली कातडी पांघरणारा तो शिंपी कोण?
इवल्याशा मेंदूतून असंख्य आदेश देणारी रचना व शरीरावर कुठेही स्पर्श / दुखापत झाली
तरी प्रत्युत्तर संदेश देणारा कोण?
१० मेगापिक्सल किवा १२ मेगापिक्सल क्यामेराचे आपण कौतुक करतो
कधी लाखो किलोमीटर अंतरावरील चंद्र, सूर्य किवा तारे बघू शकणार्या डोळ्यांचा मेगा पिक्सल किती असेल याचा विचार केला आपण?
असं सगळ आहे.
विचार करायला गेलो कि मन थक्क होतं,
अन काही प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत राहतात….
स्मशान : हल्ली निवांत भेट होण्याची जागा
कदाचित तुम्ही म्हणाल की, काल नाही ब्लॉग लिहायला लागला तर काही हि बरळतोय कि काय
पण सकाळीच एका मातीला जावून आलो..
आमच्या जवळच राहणाऱ्या आजी गेल्या… आजी म्हणजे एक जिव्हाळ्याचा शब्द आहे… नाही का?
त्यांचा वयही खूप होत पण त्या दोन चार दिवसापूर्वी ठणठणीत होत्या, गेल्या दोन-चार दिवसात अन्न पाणी जात नव्हतं इतकंच..
स्मशानात जात असताना आजू बाजूला झालेल्या इमारती पाहुनी एकजण हळूच कुजबुजला
कि अरे रोज असे हे दृश्य बघायला लागणार असेल तर इथे कशाला आपण घर घ्यायचे…?
नशीब त्या आजूबाजूच्या कुठल्याच इमारतीचा बिल्डर आमच्या सोबत नव्हता….
आणि त्याने हि जर गोष्ट ऐकली तर त्याला “इथले स्मशान आम्ही दुसरीकडे हलवणार आहोत” अशी जाहिरात केल्याशिवाय त्याचे block जाणार नाहीत
हे नक्की करायला पाहिजे…
आम्ही स्मशानात गेल्यावर सगळी तयारी सुरु असताना एक एक ग्रुप तयार झाले…
कोणी सोसायटी वर बोलत होते, कि
किती दिवस झाले अजून सोसायटी झाली नाही………. बिल्डर कॉमपौंड घालणार होता, हे करणार होता,
कुणीतरी तावातावाने बोलत होता, एकही सोसायटी अशी नाही कि जिथे भानगड नाही, कुठे कोण बिल्डर ला
शिव्या घालत होते, तर कुणी सोसायटी ची थकबाकी ठेवली त्याला…. बर आवाजाचा volume कमी होत नव्हता
एकीकडे इथल्या ब्राह्मण समाजाच्या वरती भाष्य चालू होते, बोलणारेही त्याच समाजाचे होते बर का?
कि अरे समाजाची आपण मीटिंग ठेवतो, त्याला कुणी येत नाही
सत्कार समारंभ ठेवले तर फक्त ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार असतो तो आणि त्याचे पालक इतकेच लोक येतात…
बाकी कुणी येत नाही. थोडक्यात समाजामधील लोकांमध्ये असलेली अनास्था त्याने बोलून दाखवली
बर इथल्याही ग्रुप मध्ये आवाजाचा volume कमी होत नव्हता.
एकीकडे महाड वरून पुण्याला जाणारा जवळचा रस्ता कसा तयार होतो आहे ते बघत होते,
बर इथल्याही ग्रुप मध्ये आवाजाचा volume कमी होत नव्हता.
तर कुणी दोन मित्र भेटले ते बोलताच होते, किती दिवसात भेट झाली नाही वगैरे वगैरे,
मधेच कुणाचे mobile phone खणखणत होते, त्यांचेही फोन वरील संवाद चालूच होते
बर इथंही आवाजाचा volume कमी होत नव्हता.
थोडक्यात जो तो प्रत्येकाला बर्याच दिवसांनी भेटत असल्याने गप्पा मारण्याचा क्षण आणि भेटण्याचा क्षण एकत्र आले..
ज्या आजी निवर्तल्या त्यांचंही वय फार होतं
निष्कर्ष असा काढला कि मृत्यू झालेल्या माणसाचे वय जेवढे जास्त तेवढा स्मशानात आवाजाचा volume जास्त
घरी परत जाताना हातात आमच्या रिकामी शिडी होती…
आणि मनामध्ये…
स्मशानात एका पाटीवर लिहिलेले
“माणसाला जीवनात काही नाही मिळाले तरी मृत्यू हा मिळतोच…”
हे वाक्य मनात घर करून राहिलं….