ऊन आलं, मग मळभ आलं..
मळभ आलं.. मग ऊन आलं
कसला चालला आहे का खेळ…
तू कशाला लावतोस यायला इतका वेळ.
तुला कळत नाही ….. मलाही काम आहेत रे.खूप…
तू येणार म्हणून रोज वाळवण लवकर उचलून ठेवते मी….
उचलली कि मळभ निघून जाते.. आणि तू … येताच नाहीस…
इतका कशाला भाव खातोस…
माहितेय न?
तू येणार, तू आलास म्हणून लोक तुझ कौतुक करतील…
पण प्रचंड पडलास किवा पूर आणलास, लोकांची दैना उडवलीस
कि हीच लोक तुला शिव्या देतील….
मी मात्र मनमुराद तुझ्यामध्ये भिजेन..
गच्च चिखलावरच्या हिरवळीसारखी सजेन..
तू येतोयस न आता? बघ चहा करायची थांबलेय मी…
तू यायच्या आधीच्य उकाड्याने ओथांबलेय मी..
त्याचा फोन हि येवून गेला…म्हणाला….
एकत्र पावसात भिजायचं न?
मी त्याला म्हणाले येतेच..
पण मला न खर तर त्याच्याकडे जात असतानाच तुझ्याबरोबर भिजत जायचंय
…मग ये न…
तुला अगतिकता कळतच नाही माझी… आणि उगाच गडबड करू नकोस येताना
तुझी माझी भेट झाली हे कुणाला कळलं नाही पाहिजे…..
माझ मन भिजवणारा नक्की कोण… तू कि तो…
कुणालाच कळलं नाही पाहिजे…
मध्ये कॉफी वाफाळती… तिकडे तो आणि इकडे मी….
दोघांच्यात चाललेला निशब्द संवाद… आणि
खिडकीच्या गजांना तुझ्या येऊन गेल्याने चिकटलेला गारवा….!!
far sundar!
khidkitoon paus wachatoy tumchi kavita….
ani hastoy gadagada!
😀