तू मला सोडून गेलीस न..
तेव्हा मला दिसली होती तगमग
तुझ्याच मनाची…
पापण्यासकट कापरं भरलेल्या
तुझ्या लोचनांची…
चेह-यावर होते हसू खोटे…
अन अश्रुना ‘पदर’ मागे लोटे
आरक्त साचले डोळ्यात…
जपून ठेवलेस न मला तू
मनातल्या तळ्यात…
मी जेव्हा निघून गेलो तिथून…
तेव्हा आणलेस मला पुन्हा आठवणीतून…
ढसा ढसा रडलीसच… अश्रू मोकळे करून…
आरक्त हि अजून लालभडक झाले..
अश्रुनी पदर भिजून गेला…….
चेह -यावर होते खरे भाव…
पापणी तर थरथरतच नव्हती आता…
मनातल वादळ तसच घोंघावत होत…
तू मला सोडून गेलीस न… तेव्हाही…
अन मी जेव्हा निघून गेलो तिथून तेव्हाही…
🙂
………very nice………..
nice