तुझ्या खिडकीशी रेंगाळणारा पावूस
मला माझ्यासारखाच वाटतो..
विरहाने व्याकूळ झालेल्या डोळ्यात
तो ढगांसारखा दाटतो..
पर्यावरण दिन
आज पर्यावरण दिन आहे.. उन्हाळ्याच्या दिवसात ए सी लावायची चर्चा होवून कृती झाली पण आज फक्त झाडे लावायची चर्चा होईल .. ती जगातील का मारतील का झाडे किती लावली याचे आकडे कागदावरच राहतील? प्रत्येकाने ए सी घेण्यापेक्षा वर्षामध्ये ५ झाडे लावून ती जर जागवली तर ए सी ची गरजच लागणार नाही का? \ भविष्याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येक जन आजचे solution काढतो आहे.. आजचे जीवन सुखकर करण्यात धन्यता माणूस भविष्य अंध:कारमय बनवत आहे.. हे कुठेतरी बदलायला पाहिजे न? या आपल्यापासूनच सुरुवात करू…