अंतरीच्या वादळांना मी साद घालत नाही..
विझलेल्या दिव्यांना उगाच मालवत नाही…
वाहिले वारे जोराने… तरी काहीच ढवळत नाही..
स्पंदनानि वेढलेला गाभारा आढळत नाही..
समुद्र आणि त्याच्या लाटा अफाट तरीही..
रेती रेती झालेले… किनारे मिळत नाही..
तव वादळात मी ज्या हरवलो होतो कधीचा
योग हा आत्ताचा कि भोग तो विधीचा …?
आता शांततेची खपली… झाकते जखमांना..
वारा प्रयास करतो… स्पर्शून भावनांना..
डोळ्यात तरळती अश्रू.. वेदनारहित…
मी बिलगतो त्या क्षणांना… नव-स्पंदनासहित…