आलाच नाहीस…
अरे तू येणार म्हणून आधी तू काळोख करतोस..
आधी वा-याला धाडतोस
मग गारवा वगैरे निर्माण करतोस…..
झाडं, पानं, हलायला लागली कि जरा वेग वाढवतोस…
सळसळ पानाच्या फांद्या झुकायला लागतात…
आणि मग वा -याचा वेग प्रचंड वाढतो…
पानं गळतात फांद्यांचे बारीक तुकडे पडतात पत्र्यांवर…
पत्रेही जरासे उडू लागतात ….
तडतड आवाज होतो….
तुझी चाहूल लागते..
पण काय होते कुणास ठाऊक …
तू येत नाहीस….
तुझ हे अस किती दिवस चालायचा?
तू येणार म्हणून कित्ती कविता झाल्यात तुझ्यावर..
तू यायच्या आधीच….
तू आला नाहीस जमिनीवर….
पण तू धबाधबा कोसळतो आहेस facebook वर
तू जमिनीवर यायलाच हव….. कारण..
या जमिनीवर जसा सुगंध जन्मतो ना….
तसा नाही जन्मत….facebook वर
May31
Very true…